मुंबई-गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात रिक्षा व कार यांच्यात अपघात

मुंबई-गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात रिक्षा व कार यांच्यात अपघात झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या अपघातात तिघेजण जखमी झाले असून यात दोन महिलांचा समावेश आहे. जखमींवर खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात आले.सुनील सावंत, स्मिता सावंत, श्‍वेता शेलार अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. सुनील सावंत हे त्यांच्या ताब्यातील रिक्षाने डोंबिवली येथून चिपळूण तालुक्यातील खेरशेत या गावी येत होते. याचवेळी अमित कदम (चिपळूण) हे कारने चिपळूणहून खेडच्या दिशेने जात होते. असे असताना परशुराम घाटात रिक्षा व कार यांची धडक बसून हा अपघात झाला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button