शिवसेनेला अशा लोकांच्या सल्ल्याची गरज नाही,या लोकांनी आधी स्वतःचा पक्ष सांभाळावा -नामदार उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेने कसे काम करावे याविषयी काही जण सल्ला देत आहेत पण शिवसैनिकांना अशा लोकांच्या सल्ल्याची गरज नाही अशी जोरदार टीका सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नवनिर्माण सेनेचे नेते परशुराम उपरकर यांचे नाव न घेता केली जे लोक आम्हाला सल्ले देत त्यांनी स्वतः आधी किती मदत केली ते जाहीर करावे आमची बांधिलकी जनतेशी आहे तुम्ही टीका केल्याने माझी जबाबदारी वाढते पण या लोकांनी आधी स्वतःचा पक्ष सांभाळावा मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक करीत आहेत आणि येथील स्थानिक नेते कोणाच्या तरी सांगण्यावरून पत्रकार परिषद घेऊन टीका करीत आहेत आपणाला फार अक्कल आहे अशा अविर्भावात कोणी हे राहू नये असाही इशारा सामंत यांनी दिला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button