कोरोना विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात काम करणाऱ्याना २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण
कोरोना विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात काम करणाऱ्याना २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणारे केंद्र चालक (संगणक परिचालक) यांचा समावेश आहे. अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
www.konkantoday.com