गणपतीपुळेत विविध घटनांमध्ये बारा पर्यटकांना बुडताना वाचवण्यात यश

रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात आज तीन वेगवेगळया घटनांमध्ये बाराजण बुडत होते परंतु स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून . बुडणा-या बाराही पर्यटकांना वाचविले .
दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहरातील चारजण गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी गेले होते. यामध्ये मारिया अखिल फकीर (१२), सिमरन अखिल फकीर (१६), मुबारक शेख (२०) आणि रत्नादिप हरिहर शहा (२४, सर्व रा. रत्नागिरी नाचणे) या चौघांचा समावेश होता. दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास हे चारही तरूण पोहण्यासाठी गणपतीपुळे समुद्रात उतरले होते. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात ओढले गेले. समुद्रात बुडू लागल्याने चौघांनीही आरडाओरड सुरू केली. चौघांचा आवाज एकुन किनाºयावरील जिवरक्षकांनी आणि ग्रामस्थांनी या चौघांचे प्राण वाचवले.
दुस-या घटनेत सायंकाळी चार वाजता बदलापूर येथून आलेले पाचजण बुडत असल्याची घटना घडली. यामध्ये प्रणय दत्तात्रय भिसे (१८), दिपक तुकाराम हरडकर (३०), विनय रविंद्र भिसे (२७), भालेश गजानन भिसे (२७) आणि विकास गजानन भिसे (२४, सर्व रा. बदलापूर) हे गणपतीपुळेत देवदर्शनासाठी आले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हे पाचहीजण समुद्रात आंघाळीसाठी उतरले असताना खोल पाण्यात बुडू लागले. यांनाही जीवरक्षक आणि स्थानिक विक्रेत्यांनी समुद्रातुन बाहेर काढले. तिसºया घटनेत मनिष सुरेश सोनवणे (३१, रा. औरंगाबाद) महेश अशोक जाधव (३९, नाशिक) आणि विशाल लक्ष्मण शिंदे (२१, हिंगोली) या तिघांना गणपतीपुळे समुद्रात बुडताना वाचण्यात आले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button