सीईओंवरील अविश्वास ठरावाचा विषय संपुष्टात-जि.प अध्यक्ष स्वरूपा साळवी

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आचल गोयल यांची बदली झाल्याने त्यांच्यावरील अविश्वास ठरावाचा विषय संपल्याचे जि.प अध्यक्ष स्वरूपा साळवी यांनी जाहीर केले.राज्य शासनाने लोकप्रतिनिधींची भावना समजून सौ. गोयल यांची बदली केल्याने राज्य शासनाचे अभिनंदन करण्यात आले.ग्रामीण विकासाला विरोध करणारे अधिकारी, खातेप्रमुख, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा देखील सौ. स्वरूपा साळवी यांनी दिला आहे.भविष्यात कामचुकार अधिकाऱयांना देखील सर्वपक्षीय सदस्यांच्या रोषाला सामोर जावं लागणार असे त्यांनी सांगितले.त्याचप्रमाणे सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त न मिळाल्याने या सबेत सदस्य आक्रमक झाले होते.सौ.साळवी यांनी हा विषय गंभीर असून यापुढे असे प्रकार झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा दिला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button