
वाढत्या साथींमुळे रक्तपेढीत रक्ताची टंचाई
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात विविध साथींनी जोर केला आहे. जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीने ही डोकेवर वर काढले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण दाखल होत आहेत. डेंग्यूच्या साथीत प्लेटलेट कमी होत असल्याने रुग्णांना प्लेटलेट्ससह रक्ताची मोठी गरज लागत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल झाल्याने रक्ताची मोठी गरज निर्माण झाली असून आे पॉझिटिव्ह, बी पॉझिटीव्ह रक्ताचा तुटवडा भासत आहे त्यामुळे रक्तपेढीत या गटाच्या रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. यासाठी नागरिकांनी जास्ती जास्त रक्तदान करण्याचे आवाहन करण्यातआले आहे.
www.konkantoday.com