
कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेले तळीये हे पूर्ण गाव वसवण्याची जबाबदारी म्हाडाने घेतली
महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून तब्बल ३२ घरं दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाली. या दुर्घटनेत मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच मोठी जीवितहानी झाली आहेआता हे गाव पुन्हा वसवण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.
“कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेले तळीये हे पूर्ण गाव वसवण्याची जबाबदारी म्हाडाने घेतली स्वीकारली आहे. मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला, कि कुणालाही अडचण भासू देणार नाही.ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती”, असं ट्वीट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
www.konkantoday.com