बीएसएनएलचे कर्मचारी संकटात ८० हजार कर्मचार्यांना देणार स्वेच्छानिवृत्ती
मुंबई: तोट्यात असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी टेलिकॉम कंपनीला खर्चाचा ताळमेळ घालणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. एकीकडे त्यांना जागा भाड्याने देवून आपला खर्च भागवावा लागत आहे. तर दुसरीकडे खर्चात कपात करण्यासाठी आपल्या सुमारे ८० हजार कर्मचार्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याची वेळ आली आहे. यासाठी सरकारकडून मंजूरी मिळताच इच्छूक कर्मचार्यांना आकर्षक पॅकेज देवून निवृत्त करण्यात येणार आहे.