बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अकरा जणांना नुकसान भरपाई

रत्नागिरी तालुक्यातील पावस गणेशगुळे परिसरात गेल्या वर्षभरात बिबट्याने अनेक लोकांना जखमी केले होते.या जखमी झालेल्या लोकांना म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांच्या हस्ते नुकसान भरपाईचा धनादेश देण्यात आला.
या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या मंजुनाथ आधीन व विश्वनाथ लिंगायत यांना प्रत्येकी १लाख पंचवीस हजार तर योगेश जाधव, विक्रांत जाधव, मंगेश खर्डे, नीलेश म्हादये, संदीप शिंदे, निखिल साळवी, विश्वास सुर्वे, नीलेश नाटेकर, बळीराम जोशीलकर यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
या धनादेश वाटपाच्या वेळी रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रियांका लगड ,वनरक्षक महादेव पाटील, वनरक्षक मिताली कुबल, नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button