
राजापुरातील रेल्वेस्थानकांवर अन्य एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, माता पूर्वादेवी ग्रामविकास मंडळ मुंबईची मागणी
कोकण रेल्वेच्या तालुक्यातील सोल्ये येथील राजापूररोड आणि सौंदळ येथील थांब्यामुळे तालुकावासियांनी देशातील विविध भागांमध्ये कोकण रेल्वेच्या माध्यमातून ये-जा करणे अधिक सुलभ झाले आहे. राजापूररोड आणि सौंदळ येथील थांब्यांनाही प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून कोकण रेल्वेच्या उत्पन्नामध्ये चांगलीच भर पडत आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या केवळ आठ रेल्वे गाड्यांना थांबा मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. सोल्ये येथील राजापूररोड सोबतच सौंदळ येथील थांब्यावर कोकण रेल्वेच्या तुतारी एक्सप्रेसला गाड्यांनाही थांबा मिळावा अशी मागणी तालुक्यातील गोठणे दोनिवडे हातणकरवाडी येथील माता पूर्वादेवी ग्रामविकास मंडळ मुंबईतर्फे कोकण रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.www.konkantoday.com