बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या निवडणुकीत अॅड संग्राम देसाई विजयी

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा या दोन राज्यांतील वकिलांच्या कौन्सिलच्या पंचवार्षिक निवडणूकीत सिंधुदुर्गचे सुपूत्र अ‍ॅड. संग्राम देसाई हे नवव्या क्रमांकाची मते घेऊन विजयी झाले. अन् राज्याच्या बार कौन्सिलचे सदस्य झाले आहेत. राज्याच्या बार कौन्सिलवर सदस्य म्हणून निवडून जाण्याचा हा सन्मान प्रथमच सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यांना मिळाला आहे. बार कौन्सिलच्या महाराष्ट्र व गोवा राज्यातून निवडून गेलल्या २५ सदस्यांमध्ये अ‍ॅड. संग्राम देसाई यांचा समावेश आहे. १ लाख २३ हजार सदस्य मतदार असलेल्या बार कौन्सिलच्या या निवडणूकीत त्यांनी जो हा अपूर्व विजय मिळविला आहे.त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी मिळविलेला हा विजय फार मोठा व ऐतिहासिक आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन आयोजित सत्काराला उत्तर देताना अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आवर्जून सांगितले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button