टूर पॅकेजच्या आमिषाने फसवणूक, चार आरोपी अटक, रत्नागिरी पोलीसांची कामगिरी

टूर पॅकेजच्या आमिषाने फसवणूककरणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात रत्नागिरी पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली
दिनांक २८/०५/२०२२ रोजी दुपारी १२.०० ते सायंकाळी ७.०० वा. चे मुदतीत कोहीनूर बीच रिसॉर्टमध्ये व्हॉस्कॉन रियल इस्टेट अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीमार्फत सेमिनार आयोजित
करुन देशात व परदेशात पर्यटनासाठी कमी किमंतीत पॅकेज दिले जाईल अशी जाहिरात फोन व व्हॉटस्अॅपव्दारे करण्यात आली होती. सदर जाहिरातीचे अनुषंगाने फिर्यादी डी. एस. चंद्रशेखर
रा. शिवाजीनगर, रत्नागिरी यांनी सदर ठिकाणी भेट दिली असता त्यांना सदर स्किमची माहिती सांगण्यात आली. तसेच दहा वर्षासाठी १,९०,०००/- रुपये व देशांतर्गत पर्यटनासाठी १,००,०००/- रुपये
भरावयास सांगितले. फिर्यादी यांना स्किम आवडल्याने त्यांनी सदर स्किममध्ये १,००,००० /- रुपये भरुनमेंबरशीप घेतली. त्यानंतर फिर्यादी यांनी मेंबरशीपचा फायदा करून घेणेसाठी कंपनीने दिलेल्या मोबाईल नंबरवर व हेल्पलाईन नंबरवर वारंवार संपर्क केला असता त्यांचेकडुन कोणतेही उत्तर मिळाले नाही.
यावरुन फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गु.र.नं. २४७/२०२२ भा.दं. वि. सं. कलम ४२०, ३४ प्रमाणे दि. १९/०६/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान सदर गुन्हय १) हसिना मोहंम्मद युसुफ शेख,रा. घाटकोपर, मुंबई, २) काजल चंद्रमणी विश्वकर्मा, रा. नागपूर, ३) अर्षद जाकीर खान उर्फ मुक्तार शेख(उमर), रा. कोंडवा पुणे ४) नितीन रामनाथ सानप, रा. मनमाड, नाशिक यांना अटक करण्यात आली असुन ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग व उपविभागीय पोलीस अधिकारी,रत्नागिरी श्री. सदाशिव वाघमारे यांचेमार्गदर्शना खाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोनि शिरीषसासणे, पोउनि/श्रीमती अनुराधा मेहेर, पोहवा / राहुल घोरपडे, पोहवा / शैलेश पाटील, पोना / वैभवनार्वेक,पोना / मनोज लिंगायत तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, रत्नागिरीचे पोनि हेमंतकुमार शहा,सपोनि /स्वामी, पोहवा / विजय आंबेकर, पोना/सत्यजित दरेकर, चापोना / दत्ता कांबळे यांनी पार पाडली.
वरील टिमला मा. पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांचेकडुन प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
सदर गुन्हयाचा अधिक तपास केला असता आरोपींनी भारतातील व महाराष्ट्रातील विविध शहरामध्ये अशाच प्रकारच्या सेमिनारचे आयोजन करुन अनेक लोकांची फसवणुक केल्याचे निष्पन्न होत
आहे. तरी अशा प्रकारचे गुन्हयांमध्ये कोणाची फसवणुक झाली असल्यास त्यांनी रत्नागिरी शहर पोलीसठाणे येथे संपर्क साधावा व इतर जिल्हयातील नागरीकांनी नजीकच्या पोलीस ठाण्याकडे तक्रार दयावीअसे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी केले आहे..
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button