भारतीय हद्दीत चीनच्या १० नौका घुसल्या कठोर कारवाईची संरक्षणमंत्र्यांकडे मागणी

रत्नागिरी ः बेकायदा पद्धतीने चीनच्या १० नौका भारतीय हद्दीत घुसल्या आहेत. हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादाययक असल्यामुळे या चीनच्या नौकांवर बंदी घालावी आणि याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात खासदार विनायक राऊत यांनी गांभीर्याने दखल घेत संरक्षणमंत्री राजनाथ सिह यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. अपुर्‍या कागदपत्रांमुळे चीनमधून दाभोळ येथे आलेल्या ८ बोटी अजूनही दाभोळ बंदरापासून सुमारे १० नॉटीकल अंतरावर उभ्या आहेत. या बोटी मासेमारीसाठी वापरल्या जातात. बोटींचा मेंटेनन्स करण्यासाठी एका एजंटच्या माध्यमातून दाभोळ येथे आल्या होत्या. मात्र दाभोळ बंदरात येण्याआधी त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसल्यामुळे या बोटींना प्रवेश नाकारण्यात आला होता. अद्यापही कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने या बोटी समुद्रातच उभ्या आहेत. त्यातच या बोटींना वायू वादळाचा देखील फटका बसल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button