चिपळूण रत्नागिरी विनावाहक बससेवेला चांगला प्रतिसाद

एक मेपासून सुरू करण्यात आलेल्या चिपळूण रत्नागिरी मार्गावर एक थांबा विनावाहक बस सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्र दिनी या सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता चिपळूण आगारातून सकाळी सात आठ व नऊ तर दुपारी एक दोन तीनवाजता रत्नागिरी मार्गावर ही बस सोडण्यात येते तर रत्नागिरीतून सकाळी दहा अकरा व बारा वाजता आणि संध्याकाळी चार पाच व सहा वाजता चिपळूण येथे जाण्यासाठी ही बस सुटते या बससेवेमुळे चिपळूण व रत्नागिरीकडे कामासाठी जाणाऱ्या अनेक प्रवाशांची चांगली सोय झाली आहे

Related Articles

Back to top button