
महाड तालुक्यातील सव गावात गरम पाण्याचे कुंड पाहण्यासाठी आलेले महाबळेश्वर येथील तीन पर्यटक सावित्री नदीमध्ये बुडाले
महाड तालुक्यातील सव गावात गरम पाण्याचे कुंड पाहण्यासाठी आलेले तीन पर्यटक सावित्री नदीमध्ये बुडाले आहेत. हे सर्व महाबळेश्वरमधून आले होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.रविवारी (18 ऑगस्ट) दुपारी दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रेस्क्यू टीम आणि स्थानिकांच्या शोध मोहिमेमुळे सायंकाळी पाचच्या सुमारास तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. बुडालेल्या तरुणांमध्ये दोन सख्खे भाऊ आणि त्यांच्या मित्राचा समावेश आहे. दिलावर शहाबुद्दीन नालबंद, मनावर शाहबुद्दीन नालबंद आणि जाहिद जाकीर पटेल अशी त्यांची नावे आहेत.महाड तालुक्यातील सव गावात गरम पाण्याचे झरे आणि एक दर्गा आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या सव गावाजवळ गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्यानंतर महाबळेश्वरमधील हे तिघे तरुण शेजारी असलेल्या जेट्टीवर गेले. येथे सावित्री नदीच्या पाण्यात हातपाय धूत असताना एकाचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा सख्खा भाऊ खाली उतरला तो देखील बुडू लागल्याने त्याचा सोबत असलेला मित्र पाण्यात उतरला. एकमेकांना वाचवण्याच्याधावपळीत तिघेही बुडाले.ही घटना रविव यामध्ये तिन्ही जणांचा मृत्यू झाला आहे. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.