
ॲड बाबासाहेब नानल गुरुकुल मध्ये वर्षारंभ, संकल्प दिन आणि 10वी गुणगौरव समारंभ उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांनी लहान वयातच आपले ध्येय निश्चित करून त्या वाटेवर मार्गक्रमण करावे आणि जीवनात यशस्वी व्हावे यासाठी मनाशी एक संकल्प करणे महत्वाचे आहे. रा.भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी. मधील ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलातील इ. ५ वी ते १० वी मधील विद्यार्थी दरवर्षी एक संकल्प करतात. आज वर्षारंभाच्या निमित्ताने गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी दररोज एक पुस्तक वाचेन, नियमित खेळ खेळेन, पाढे न चुकता पाठ करेन, सुंदर हस्ताक्षर, चित्र काढणे, इंग्रजी पुस्तक वाचन असे लहान लहान संकल्प केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वालनाने झाली. मुंबई विद्यापीठ उपकेंद्र मधील प्राध्यापक डॉ. पांडुरंग पाटिल सर, गुरुकुल व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. लोवलेकर सर, गुरुकुल समन्वयक प्राध्यापक श्री. निनाद तेंडुलकर सर आणि रा .भा. शिर्के प्रशालेतील इतिहास विषय शिक्षक श्री राजेश आयरे सर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते. गुरुकुल प्रमुख श्री. किरण दादा सनगरे यानी विद्यार्थ्यांना उपासना सांगितली, त्यानंतर गुरुकुलच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अतिशय सुरेल अशी प्रार्थना, ईशस्तव आणि स्वागतगीत सादर केले.
गुणगौरव समारंभ इयत्ता 10 वी मध्ये प्रथम क्रमांक कु. नीता कोळेकर. , द्वितीय क्रमांक कु. अंश वाघमारे , तृतीय क्रमांक कु. विधी डोईफोडे या उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभानंतर गुरुकुल शिक्षण पद्धती आणि पंचकोश विकासन या विषयी प्रमुख वक्ते श्री. राजेश आयरे यांनी पालक आणि विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. तसेच प्राध्यापक डॉ. पांडुरंग पाटील सर आणि प्राध्यापक श्री निनाद तेंडुलकर सर यांनी सुद्धा आपल्या भाषणाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
गुरुकुल मधील अध्यापक वृंद श्री.गौरव पिलणकर दादा, श्री. सुदेश निवळकर दादा, श्री. सागर रसाळ दादा, श्री श्रेयश फटकरे दादा , श्री. अक्षय नवरे दादा, श्री. यश रहाटे दादा , सौ मनस्वीनी भोळे ताई , सौ.सरोज पवार ताई, श्री. संदिप तेंडुलकर मामा यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरीत्या केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नेत्रा टिकेकर ताई यांनी केले. तर ,सौ. गिरिजा करकरे ताईंनी आभार मानले.