
कोकणात उद्धव ठाकरे आग लावण्यासाठी आलेत, नारायण राणे यांचा आरोप
उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे महाराष्टाचे मुख्यमंत्री होते. मात्र केवळ दोन दिवस ते मंत्रालयात गेले. कोणतेही काम त्यांनी कोकणसाठी केले नाही. त्यांच्या खासदाराला साधं कोकणातील गावांमधील नावे सांगता येत नाहीत. आता केवळ कोकणात आग लावण्यासाठी ते आले आहेत, अशी घणाघाती टीका रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार नारायण राणे यांनी केली.शहरातील शिर्के प्रशालेच्या मैदानावर आयोजित मनसेच्या मेळाव्यात राणे बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री, उदय सामंत, मनसेचे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, प्रकाश महाजन, अविनाश जाधव, मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर, माजी आमदार बाळ माने, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आदी उपस्थित होते.www.konkantoday.com