भवानी शाखेच्या वतीने अंगणवाडीत बालदिन उत्साहात साजरा


रत्नागिरी: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा होणारा ‘बालदिन’ राष्ट्रसेविका समिती, भवानी शाखेच्या वतीने शांतीनगर येथील अंगणवाडीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सेविकांनी लहानग्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या निरागसतेचा आनंद घेतला.

बालदिनाचे औचित्य साधून भवानी मंडप, शांतीनगर येथील अंगणवाडीत सकाळी ११ वाजता भवानी शाखेच्या एकूण ५ सेविका उपस्थित झाल्या. सेविका येणार असल्याची पूर्वकल्पना असल्याने मुलांनी ‘नमस्ते’ म्हणून त्यांचे उत्साहाने स्वागत केले. सर्वप्रथम, सेविकांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. अंगणवाडीतील बाईंनाही गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

सेविकांनी लहानग्यांसाठी खास सोप्या भाषेत पंडित नेहरू यांच्या जीवनातील एक छोटीशी गोष्ट सांगितली. तसेच, दोन छान बडबड गीते मुलांना शिकवण्यात आली, ज्याचा मुलांनीही आनंद घेतला. उपस्थित २२ विद्यार्थ्यांनीही त्यांना येत असलेले एक गाणे म्हणून दाखवले. मुलांचे निरागस हास्य पाहून सेविकांनाही खूप आनंद झाला.
कार्यक्रमाच्या शेवटी, मुलांचे आरोग्य आणि हक्क जपण्याचा संदेश देत सर्व लहानग्यांना छोटी भेटवस्तू व खाऊ वाटप करण्यात आला. एकूण २९ जणांच्या त्यात सेविका ५, विद्यार्थी २२, इतर २ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. सेविकांच्या उपस्थितीबद्दल अंगणवाडीच्या बाईंनी आनंद व्यक्त केला आणि ‘बालदिनाचा कार्यक्रम खूप छान झाला’ असा अभिप्राय दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button