
रत्नागिरी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी २५०० कोटींच्या निधीची आवश्यकता
रत्नागिरी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे जाळे पूर्ण करण्यासाठी आणि रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी सुमारे २५०० कोटी रुपयांच्या अवाढव्य निधीची आवश्यकता आहे. या निधीच्या उपलब्धतेनंतरच जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची कामे खर्या अर्थाने गती घेणार आहेत. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून, खेड तालुक्यातील ’पोयनार’ आणि ’न्यू मांडवे’ या दोन अत्यंत महत्त्वाच्या लघु पाटबंधारे प्रकल्पांना राज्य शासनाने १६ मार्च २०२६ रोजी द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
www.konkantoday.com




