
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा शुक्रवारी जनता दरबार
रत्नागिरी, दि. 8 ):- जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तात्काळ निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा शुक्रवार 10 एप्रिल रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे “जनता दरबार” आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत स्वतः उपस्थित राहून जनतेच्या प्रश्नांचे निराकारण करणार आहेत. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
000




