
रत्नागिरी शहरातील मिर्याबंदर येथे पर्यटकांची कार उलटली
रत्नागिरी शहरातील मिर्याबंदर येथे चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटून उपघात झाला. ही घटना रविवारी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. ही कार जिल्ह्याबाहेर पर्यटकांची असल्याची माहिती समोर येत आहे. हे पर्यटक मिर्याबंदर येथे फिरण्यासाठी आले होते.www.konkantoday.com



