गोव्यात गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या ‘समुद्र प्रताप’चे लोकार्पण;


भारत बलाढ्य सागरी राष्ट्र म्हणून उदयास येत आहे. हिंदी महासागर क्षेत्रामध्ये स्थिरता, सहकार्य व नियमाधारित व्यवस्था सुनिश्चित करण्यात भारताची भूमिका महत्त्वाची होत चालल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले.दरम्यान, भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास चेहरामोहराच बदलून टाकू, असा इशाराही त्यांनी नाव न घेता पाकिस्तानला दिला आहे.गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या दोन मालिकेतील पहिले व भारतीय तटरक्षक दलाचे सर्वात मोठे प्रदूषण नियंत्रण जहाज ‌’समुद्र प्रताप‌’ भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये सामावून घेण्याच्या सोहळ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार कॅ. विरिएतो फर्नांडिस, आमदार कृष्णा साळकर, संरक्षण मंत्रालयाचे सचिव राजेश कुमार, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी, गोवा ‌’समुद्र प्रताप‌’ जहाजाचे प्रमुख व उपमहानिरीक्षक अशोककुमार भामा, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ब्रजेशकुमार उपाध्याय उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button