
रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथील एकतानगर परिसरातविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथील एकतानगर परिसरात ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्यापूर्वी एका ३३ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी पंख्याला नायलॉन साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नम्रता बाळासाहेब अकिवटे (वय ३३, रा. एकतानगर, खेडशी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
नम्रता अकिवटे यांनी खेडशी येथील त्यांच्या घरी सिलिंग फॅनला नायलॉनची साडी बांधली आणि तिचा फास गळ्यात अडकवून गळफास घेतला. ही घटना सायंकाळी ५.१५ च्या सुमारास उघडकीस आली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.




