राजापूर तालुक्यातील पन्हळे येथे कारला बैलाची धडक, कारचे नुकसान


राजापूर तालुक्यातील पन्हळे येथे बैल आडवा आल्याने अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यामध्ये कारचे नुकसान झाले असून पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गावर फिरणार्‍या मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून त्याचाच थेट फटका आता निष्पाप जनावरांच्या जीवावर उठला आहे. मंगळवारी सायंकाळी राजापूर प्रांत कार्यालयासमोरील पुलावर वाहनाच्या धडकेत एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पन्हळे येथे बैल आडवा आल्याने अपघात झाला. एमएच ०४ एचएक्स ८४३२ ही कार कुडाळवरून मुंबईकडे चालली होती. राजापूर-पन्हळे येथे आली असता समोरून अचानक बल आडवा आला. मात्र चालकांने प्रसंग पाहून कारचा वेग कमी केल्याने बैलाला धडक बसली. यामध्ये बैल धडक बसताच पळून गेला, मात्र यामध्ये कारचे नुकसान झाले. प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button