देवरुख येथील साेने व्यापारी अपहरण प्रकरणी संशयिताचा अटकपूर्व जामीन ेटाळला


देवरुख येथील साेने व्यापाèयाचे अपहरण करून लुटल्याचा आराेप असलेल्या टाेळीतील संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने ेटाळला. सागर प्रकाश कदम (34, कदमवाडी, हातखंबा) असे संशयिताचे नाव आहे. सागर हा गुन्ह्यातील मास्टरमाईंड असल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले आहे. ताे मागील दाेन महिन्यांपासून पसार असून पाेलिसांकडून त्याचा कसून शाेध घेतला जात आहे. आपली अटक टाळण्यासाठी सागरने जिल्हा सत्र न्यायालयापुढे जामीनासाठी अर्ज दाखल केला हाेता.
17 सप्टेंबर राेजी साेने व्यापारी धनंजय केतकर यांच्या चेहèयावर काळा बुरखा घालून जबरदस्तीने इर्टीगा गाडीत काेंबून अपहरण करण्यात आले हाेते. ही घटना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास देवरुख-साखरपा मार्गावरील वांझाेळे येथे घडली हाेती. अपहरणकत्यांनी केतकर यांच्याकडून 14 लाख रुपये किमतीच्या साेन्यासह 20 हजार रुपयांची राेख रक्कम लुटली. तसेच केतकर यांना येथे पुलाखाली साेडून देण्यात आले याप्रकरणी देवरुख पाेलीस ठाण्यात जणांवर भारतीय न्याय संहिता च्या कलम 309 (4), 310(1), 140 (2), 127(2), 115 351 (2), 317 (3) अंतर्गत दाखल करण्यात आला. पाेलिसांनी याप्रकरणी चाैघा संशयितांना अटक केली हाेती. त्यांच्या चाैकशीत सागर कदम हा मुख्य संशयित असल्याचे उघड झाले हाेते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button