महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार तर महायुतीचा नगराध्यक्ष हा १५ हजाराच्या फरकाने निवडून येणार : पालकमंत्री ना. उदय सामंत यांचा विश्वास


आज पालकमंत्री उदय सामंत आमदार किरण सामंत व आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत महायुतीच्या उमेदवाराने शक्ती प्रदर्शन करीत आपले अर्ज दाखल केले
महायुतीकडून आज पहिल्या टप्प्यात १५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील महायुतीच्या उमेदवारांची यादी १६ किंवा १७ तारखेला जाहीर करण्यात येणार असून, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार १७ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करेल. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निश्चितपणे विजयी होतील आणि महायुतीचा नगराध्यक्ष हा १५ हजाराच्या फरकाने निवडून येईल असा विश्वास रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केला.

रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शनिवारी दि. १५ रोजी महायुतीच्या १५ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यात शिवसेनेकडून ९ तर भाजपकडून ६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार निरंजन डावखरे, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, अतुल काळसेकर, यशवंत जाधव, ॲड. दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर, अनिकेत पटवर्धन यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना. सामंत यांनी महायुतीचे उमेदवार निश्चितपणे विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button