
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची मानवंदना
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी या ठिकाणी दिनांक ०३ व ०४ नोव्हेबर २०२५ रोजी दोन दिवस होणार “गौरव गाथा संविधानाची” आणि “जागर संविधानाचा” सांस्कृतिक कार्यक्रम
मुंबई २९ ऑक्टोंबर
यंदाचे वर्ष भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमातून संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी या ठिकाणी दिनांक ०३ नोव्हेबर २०२५ रोजी सायंकाळी ६:३० ते १०:०० या वेळेत गौरव गाथा संविधानाची आणि दि. ०४ नोव्हेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ६:३० ते १०:०० या वेळेत जागर संविधानाचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. “गौरव गाथा संविधानाची” आणि “जागर संविधानाचा” या कार्यक्रमाची संकल्पना ॲड आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन डॉ.किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांचे लाभले आहे. रसिक प्रेक्षकांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय श्री विभीषण चवरे यांनी केली आहे.




