रत्नागिरी शहराजवळील मिर्‍या समुद्रकिनार्‍यावरची स्वच्छता मोहीम यशस्वी


शिवाजी हायस्कूल, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन शिरगांव सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगांव, जलजीविका संस्था पुणे, सागरी सीमा मंच, मिर्‍या स्टुडंटस फॉर डेव्हलपमेंट रत्नागिरी या सर्व संस्थांनी संयुक्तपणे मिर्‍या समुद्रकिनारा येथे आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनानिमित्ताने साफसफाईचा आणि स्वच्छतेचा कार्यक्रम यशस्वी केला.
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी उपस्थित सर्वांना आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनाचे महत्व विषद करून स्वच्छतेची शपथ दिली. समुद्रकिनारा स्वच्छतेची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. या समुद्रकिनार्‍यावर खूप मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक घरातील टाकावू वस्तू आढळून आल्या. गोळा केलेला सर्व कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली.
यावेळी सागरी सीमा मंचाचे स्वप्निल सावंत, संजीव लिमये, रंजना आगाशे, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ. आसीफ पागारकर, अभिरक्षक डॉ. हरिश धम्मगये, नरेंद्र चौगुले, वर्षा सदावर्ते, अर्चना सावंत, जाई साळवी, रमेश सावर्डेकर, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राध्यापक निलेश मिराजकर, रोहित बुरटे, सुशील कांबळे, मयुरी डोंगरे आणि सर्व कर्मचारी विद्यार्थी हजर होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button