मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूला जाणारारस्ता खचला, तब्बल 20 फुटांचा खड्डा


मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूला जाणारा रस्ता खचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाडीहून अटल सेतूकडे जाणारा रस्ता खचला आहे. रस्त्याचा भाग थेट खाली नाल्यात पडला आहे.सुदैवाने रस्ता खचला तेव्हा कुठलीही गाडी तिथून जात नव्हती. अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होता. विशेष म्हणजे या रस्त्यावर तब्बल 20 फुटांचा खड्डा पडला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. तसेच सध्या पाऊसही पडत नाहीय. तरिही रस्ता खचल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रस्त्याचं काम निकृष्ठ दर्जाचं होतं का? असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत आहे. संबंधित घटना ही शिवडी येथे BPT रोडवर घडल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांपासून हा खड्डा पडला आहे. पण प्रशासनाने याकडे चार दिवसांपासून दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.

शिवडीहून अटल सेतूकडे जाणारा रस्ता खचला आहे. या रस्त्यावर तब्बल 20 फुटांचा खड्डा पडला आहे. या खड्ड्याशेजारी आता पोलिसांकडून बॅरिकेंटींग करण्यात आलं आहे. या घटनेनंतर स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांनी प्रशासनालाला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांकडून इथे बॅरिकेट्स लावण्यात आले. सध्या हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button