
ओम साई मित्र मंडळ गणेशोत्सवानिमित्ताने जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी : ओम साई मित्र मंडळ गणेशोत्सवानिमित्ताने रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ओम साई मित्र मंडळ हॉल, नाचणे (रत्नागिरी) येथे ३० व ३१ ऑगस्ट या कालावधीत ॐ साई मित्र मंडळ चषक या नावाने रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२५-२६ आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट आणि किशोरी गट अशा सात गटात खेळवली जाणार आहे. या वर्षातील ही चौथी स्पर्धा आहे. त्यामुळे खेळाडूंनी २०२५-२६ या वर्षाची रजिस्टेशन फी ५० रुपये जिल्हा असोसिएशनकडे जमा करावी. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवशक आहे अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करणात येईल. आपली प्रवेशिका रविवारी (२४ ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजेपर्यंतच आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित द्यावात. स्पर्धेत सामना खेळणासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे.
या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत याची सर्व स्पर्धकांनी नोंद घावी.
तालुका प्रतिनिधी असे : गुहागर – प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), रत्नागिरी- विनायक जोशी (८३९०३८७४८३), देवरूख – राहुल भस्मे (९६५७६३७६७८), मोहन हजारे (९४२२०५३९४३), चिपळूण – प्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), दीपक वाटेकर (९९७५५४६६२५), संगमेश्वर – मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), लांजा – मनोज जाधव (७६२०११६७३६), खेड – योगेश आपटे (९९५३२२२६३१), राजापूर- मनोज सप्रे (९४०३७६८३७६), दापोली- माधव शेट्ये (९२०९७०९७९२)
या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राज्यस्तरीय पंच मंदार दळवी व सागर कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन ॐ साई मित्र मंडळाचे अध्यक्ष अनंत आगाशे, सेक्रेटरी प्रवीण नांदगावकर, खजिनदार पराग सावंत, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते, खजिनदार नितीन लिमये यांनी केले आहे.