अमेरिकेच्या वाढीव करामुळे भारताच्या मत्स्य व्यवसायाच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता


अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५० टक्के कर लादल्याने भारताच्या मत्स्य व्यवसायाच्या निर्यातीवर लक्षणीय परिणाम होवू शकतो. या चितेच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने सागरी खाद्यान्य निर्यातदारांना कोळंबी आणि इतर माशांच्या जातीसाठी पर्यायी बाजारपेठ शोधण्यास सांगितले. स्थानिक बाजारपेठेतील माशांच्या किंमतीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
भारत सध्या अमेरिकेला गोठवलेल्या कोळंबी आणि कोळंबीचा आघाडीचा पुरवठादार आहे. त्याचा बाजारातील वाटा २०१५ मध्ये २४४ टक्क्यांवरून २०२४ मध्ये ४०६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. वाढीव शुल्कामुळे अमेरिकेतील भारताच्या बाजारपेठेतील वाट्यावर परिणाम होणार असल्याने देशाला पर्यायी बाजारपेठांचा शोध घ्यावा लागेल. निर्यातदारांसाठी झालेल्या बैठकीत भारताच्या बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी रणनीती आखण्यात आली. यासाठी निवडलेल्या पर्यायी बाजारपेठांमध्ये इंग्लंड, युरोपियन युनियन (ईयु), ओमान, युएई, दक्षिण कोरिया, रशिया आणि चीन यांचा समावेश आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button