
रत्नागिरीतील अजिंक्य बुट्टे याची राज्यात चमकदार कामगिरी – मंथन शिष्यवृत्ती परीक्षेत १० वा क्रमांक
जिल्हा परिषद शाळा आदर्श वसाहत, कारवांची वाडी नं. २, तालुका व जिल्हा रत्नागिरी येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी कु. अजिंक्य किशन बुट्टे याने मंथन शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर १० वा क्रमांक आणि जिल्हास्तरावर ५ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
अजिंक्यच्या या यशामागे त्याची चिकाटी, सातत्याने घेतलेली मेहनत आणि मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती रेणुका उपाध्याय यांचे योग्य मार्गदर्शन आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता सावंत यांचे देखील या प्रगतीत मोलाचे योगदान आहे. अजिंक्यच्या या घवघवीत यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून, संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंथन शिष्यवृत्ती परीक्षा ही राज्यभरातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत स्पर्धात्मक व प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते. अशा परीक्षेत अजिंक्यने मिळवलेले स्थान हे रत्नागिरी जिल्ह्यासाठी गौरवाचे आहे.
शाळा प्रशासन, शिक्षकवृंद व पालकांनी अजिंक्यचे यश अत्यंत आनंदाने साजरे केले असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा