
रत्नागिरी तालुक्यातील बेहेरेवाडी, मेर्वी येथे मुंबईहून आलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील बेहेरेवाडी, मेर्वी येथे गणपती सणादरम्यान एका ५१ वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० ते २८ ऑगस्ट रोजी दुपारी १:३० च्या दरम्यान घडली. मृत व्यक्तीचे नाव सतिश सखाराम पुजारी (वय ५१) असे आहे.
सतिश पुजारी हे मूळ विलेपार्ले, मुंबई येथील रहिवासी असून, गणपती सणासाठी २४ ऑगस्ट रोजी सकाळी ८:०० वाजता रत्नागिरीतील बेहेरेवाडी, मेर्वी येथे खबर देणाऱ्याच्या घरी आले होते. २७ ऑगस्ट रोजी गणपती स्थापनेच्या कार्यक्रमानंतर दुपारी १२:३० च्या सुमारास सतिश यांनी कोणालाही काही न सांगता घर सोडले. बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने खबर देणाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. शोधादरम्यान, काळीकोंड येथील अशोक बेहेरे यांच्या आंब्याच्या बागेजवळील वाहत्या पाण्याच्या पात्रात सतिश उपड्या अवस्थेत आढळले.
त्यांना खासगी रुग्णवाहिकेद्वारे सतिश यांना प्रथम पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले




