दापोली तालुक्यातील महत्वाच्या समुद्रकिनारे, धबधब्यांवर राहणार पोलिसांची नजर.

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार दापोलीतील महत्वाच्या समुद्रकिनार्‍यांवर व धबधब्यांच्या ठिकाणी पोलिसांकडून पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. शिवाय ग्रामपंचायतींना सुचना फलक लावण्यासाठी पत्र देण्यात येणार असल्याचे दापोली पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले.तालुक्यात पावसाळ्यातही समुद्रकिनार्‍यावर नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करीत आहेत. स्थानिकांच्या सूचनांनाही ते जुमानत नाहीत. दापोली पोलिसांकडून वेळोवेळी समुद्रकिनार्‍यांकडे लत्र असते. परंतु धबधब्यांवरही लक्ष ठेवणे आता आवश्यक बनले आहे. शिवाय ग्रामपंचायतीनीही समुद्रकिनार्‍यांसह धबधब्यांवर सूचक फलक लावणे गरजेचे आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button