वीज देयक थकवले? आता सुरक्षा ठेवीतून वसुली, अन्यथा वीजजोडणी खंडित!

नागपूर :* राज्यातील बहुतांश भागात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणचे वीज देयक आजही मोठ्या प्रमाणात थकवले जातात. त्यामुळे महावितरणची आर्थिक कोंडी होत आहे. दुसरीकडे महावितरणवर कर्जाचा डोंगरही वाढत आहे. कंपनीकडून वीज देयक थकवणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार दोन महिने सलग देयक न भरल्यास तिसऱ्या महिन्यात नवीनच पद्दतीने कारवाईचा निर्णय कंपनीकडून घेतला गेला आहे.महावितरण कंपनीकडून वीज देयकाची रक्कम थकवणाऱ्या ग्राहकांसाठी १५ जुलैपासून नवीन नियम लागू झाले आहे. त्यानुसार दोन महिने वीज देयक थकवणाऱ्या ग्राहकांच्या कंपनीकडे (महावितरण) जमा असलेल्या सुरक्षा ठेवीतून तिसऱ्या महिन्यात महावितरण थकीत देयकाची रक्कम वळती करून घेणार आहे. त्यानंतर सुरक्षा ठेवीसह थकीत रक्कम भरणे ग्राहकांना बंधनकारक असेल.

ही पद्धत काय असेल याबाबत आपण जाणून घेऊ या. दरम्यान मुंबईचा काही भाग वगळून राज्यातील बहुतांश भागात महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो.महावितरणची सगळ्याच संवर्गातील ग्राहकांकडे वीज देयकाची थकबाकी प्रत्येक वर्षी वाढत असून कंपनी आर्थिक अडचणीत आहे. दरम्यान कंपनीने वीज देयक थकवणाऱ्या ग्राहकांवर अंकुश लावण्यासाठी नवीन नियम लागू केले आहे. त्यानुसार महावितरणच्या ग्राहकाने सलग दोन महिन्यांचे वीज देयक थकवल्यास तिसऱ्या महिन्यात कंपनीकडून ग्राहकाचे महावितरणकडे जमा असलेल्या सुरक्षा ठेवीतून ही थकबाकीची रक्कम वळती करून घेतली जाणार आहे. त्यानंतर ग्राहकाला प्रथम सुरक्षा ठेवीची रक्कम व त्यानंतर देयकातील इतर शिल्लक देयकाची रक्कम भरणे बंधनकारक असेल.या प्रकारामुळे ज्या ग्राहकांनी महावितरणकडून प्रत्येक वर्षी वाढीव वीज देयकानुसार पाठवले जात असलेल्या सुरक्षा ठेवीची रक्कम भरली नसेल, त्याला ही संपूर्ण रक्कम भरावी लागेल. त्यानंतच संबंधित ग्राहकाचे शिल्लक देयक भरता येईल. ही रक्कम न भरल्यास ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला जाईल. त्यानंतर ग्राहकाला हा वीज पुरवठा पून्हा सुरू करण्यासाठी पूर्वीची सुरक्षा ठेव, देयकाची थकबाकी भरल्यावर पून्हा वीज जोडणी शुल्क भरूनच वीज जोडणी पूर्ववत करता येणार आहे.

*महावितरणच्या ग्राहकांनी पूर्वी सलग दोन महिने देयक न भरल्यास तिसऱ्या महिन्यात ग्राहकाला पंधरा दिवसाची देयक भरण्याबाबतची नोटीस दिली जात होती. त्यानंतरही वीज देयक ग्राहकाने भरले नाही तर वीज पुरवठा तात्पूरता खंडित केला जात होता. यावेळी ग्राहकाचे महावितरणकडे जमा असलेल्या सुरक्षा ठेवीतील रक्कम ग्राहकाच्या देयकात वळती केली जात नव्हती. कायम वीज पुरवठा खंडित झाल्यावर मात्र सुरक्षा ठेवीतील रक्कम थकबाकीतून वळती केली जात होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button