काही जमिनी भूसंपादन प्रक्रियेतून वगळा, गडनरळ ग्रामस्थांची मागणी

आमच्या बहुतांशी जमिनीवर शेती आणि आंबा बागायती तसेच राहती घरे आहेत. अशा काही जमिनी भूसंपादन प्रक्रियेतून वगळण्यात याव्यात, अशी मागणी गडनरळ ग्रामस्थांकडून केली. या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले. तालुक्यातील वाटद एमआयडीसी भूसंपादनासंदर्भात गुरूवारी वैयक्तिक हरकतीवरील सुनावणी पूर्ण झाल्याचे सांगितले.एमआयडीसी भूसंपादनासंदर्भात हरकतींवर गुरूवारी सकाळी गडनरळ गावातील ग्रामस्थांच्या वैयक्तिक अर्जांवरील सुनावणी पार पडली. गडनरळ गावातील १२ अर्जांपैकी ६० ग्रामस्थांच्या हरकतींवरील म्हणणे उपविभागीय अधिकार्‍यांच्या कार्यालयात ऐकून घेतले. सकाळी ११ च्या सुनावणीसाठी गडनरळ गावातील हरकती दाखल केलेले ६० ग्रामस्थ सुनावणीसाठी हजर होते. यावेळी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना करमाळे उपस्थित होत्या.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button