
रत्नागिरी जिल्ह्याला मिळणार ३५ नव्या आशा सेविका.
रत्नागिरी जिल्हयाला नव्या ३५ आशा सेविका मिळणार आहेत. त्यामुळे संबंधित तालुक्यांमध्ये भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र यावेळी पारदर्शकता आणण्यासाठी ग्रामपंचायतीचे अधिकार काढून ते आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मानधन वाढले असल्याने इच्छुकांमध्ये चुरसही वाढली आहे.आरोग्य विभागाच्या कामकाजाचा विचार करता त्यात आशा सेविकांचेही मोठे योगदान असते. त्यामुळे गावागावात त्यांचे असणे महत्वाचे ठरत आहे. सध्याचा विचार करता जिल्हयात हजारो आशा सेविका कार्यरत आहेत. काही वर्षे संबंधित मागे जाता त्यांना अल्प मानधनात काम करावे लागत बर्यापैकी वाढ झाली असून नियमित काम करणार्या आशांना कमीत तालुक्यांमध्ये होते. मात्र अलिकडे भरती प्रक्रिया या मानधनात सुरू कमी १० हजार रुपये इतके मानधन मिळते. यापेक्षा जास्त मानधन घेणार्या आशाही जिल्ह्यात आहेत.www.konkantoday.com