
विद्यार्थी संख्या कमी असल्याने कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही -एकनाथ शिंदे
राज्यातील 18 हजार सरकारी, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे मात्र विद्यार्थी संख्या कमी असल्याने कोणतीही शाळा बंद केली जाणार नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदे लक्षवेधीच्या उत्तरात बोलताना दिली
दरम्यान आमदार विक्रम काळे यांनी राज्यातील सरकारी, जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्या असलेल्या शाळ बंद केल्या जात असल्याने शिक्षकांचे समायोजन संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या जाणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. तर दुसरीकडे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी देखील सरकारने कोणतीही शाळा बंद केली नसल्याची माहिती विधान परिषदेमध्ये दिली आहे.
या लक्षवेधीवर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सध्या राज्यात 1 लाख 8 हजार शाळा असून त्यापैकी 18 हजार शाळांमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे. तरी देखील त्या शाळा सुरु राहणार असून त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाईल आणि ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची देखील माहिती यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.