ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्याकडून रत्नागिरी नगर परिषद सफाई कामगाराला मारहाण, माफी नाम्या नंतर प्रकरण मिटले


रत्नागिरी नगर परिषद सफाई कामगाराला मारहाण केल्याचा प्रकार काल सकाळी घडला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने ही मारहाण केली. फोन न उचलण्यावरून राजवाडा येथे हा मारहाणीचा प्रकार घडला. या घटनेनंतर संतापलेल्या सफाई कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले. मात्र उबाठाचे पदाधिकारी, मुख्याधिकारी यांनी मध्यस्थी करून उबाठ्याच्या त्या कार्यकर्त्यांने लेखी माफी नामा दिल्यानंतर प्रकरण नितळले आणि कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. भविष्यात असे काही केले तर याद राख, नोकरीचा विचार करणार नाही. काय व्हायचे ते होऊदे, अशा शब्दात संतप्त कर्मचारी, अधिकाऱ्यांनी उबाठाच्या त्या कार्यकर्त्याला सुनावले.
पालिकेच्या सफाई कामगारांचे मुकादम मनोहर कदम राजीवडा येथे सफाई कामासाठी गेले होते. तेथील उबाठाचे कार्यकर्ते साजिद पावसकर हे त्यांना फोन करत होते. पंरतु त्यांनी फोन उचलले नाही, यामुळे पावसकर संतापले होते. या दरम्यान कदम राजीवडा येथे गेल्यानंत कदम आणि पावसकर आमने-सामने आले. दोघांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक उडाली. याचे पर्यवसान हाणामारीत झाले. साजिद पावसकर याने कदम यांना मारहाण केली. शासकीय काम करत असताना मारहाण केल्यामुळे पालिकेच्या कर्मचारी संघटनेने एकत्र येऊन कामबंद आंदोलन पुकराले. सर्व कर्मचारी वर्ग पालिकेत गोळा झाला. घडलेल्या घटनेचे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. पावसकर यांच्या नेहमीच्या अशा वागण्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप होता. परंतु उबाठाचे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे आणि मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी बोलून गुन्हा दाखल न करता काहीतरी तोडगा काढा, अशी विनंती साळुंखे यांनी केली. साळुंखे, साजित पावसकर हे मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये होते. अखेर पोलिस ठाण्याचे हेलपाटे मारण्यापेक्षा पावसकर यांनी लेखी माफिनामा द्यावा, अशी मागणी सफाई कर्मचाऱ्यांनी केली. त्यानंतर साळुंखे यांनी समजावून सांगितल्यानंतर लेखी माफिनामा दिला. तसेच सर्व कर्मचाऱ्यांसमोर साजिद पावसकर यांनी मनोहर कदम यांची माफी मागितली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button