पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी


राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील बावनदी, वांद्री, संगमेश्वर या विविध ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाची दोन दिवसांपूर्वी प्रत्यक्ष पाहणी केली. जेथे खड्डे आहेत, त्या ठिकाणी तातडीने खड्डे भरावेत अशा सूचना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पुढील शनिवारी पुन्हा या रस्त्याची पाहणी करून आढावा घेणार असल्याचे सांगितले.

काहीजण मुंबई-गोवा महामार्गाबाबत गैरसमज पसरवत आहेत. म्हणून मी स्वतः रत्नागिरीपासून चिपळूणपर्यंत संपूर्ण रस्त्याची पाहणी अधिकाऱ्यांसह केली आणि सत्य समोर आलं असल्याचे सामंत म्हणाले
एकूण रस्ता – ३५५ किमी
🔹त्यातील ३३४ किमी म्हणजेच ९३.१८% काम पूर्ण
🔹 आरवली ते कांटे प्रलंबित (फक्त २०% काम बाकी)
🔹 उर्वरित २१.१९ किमी मध्ये साडेचार किमी डबल लेन काम पूर्ण व्हायचं आहे.

मुद्दाम खड्डे असलेल्या ठिकाणी , पाहणी केली.
जेव्हा ही साडेचार किमी डबल लेन पूर्ण होईल, तेव्हा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्णत्वास जाईल, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button