कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना भूमिहीन इच्छूक पात्र अर्जदाराने अर्ज करा – दीपक घाटे.

रत्नागिरी, दि. 1 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून अनु. जाती व नवबौध्द घटकांना १०० टक्के अनुदानावर (मोफत) शेतजमीन उपलब्ध करून देण्याबाबतची कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत अनु. जाती व नवबौध्द घटकाच्या दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबाला जमीन उपलब्ध करून देण्यात येते. तरी इच्छूक पात्र अर्जदाराने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, कुवारबांव, येथे अटींची पूर्तता करणारे पुरावे / कागदपत्रासह संपर्क साधून अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण दीपक घाटे यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत अनु.जाती व नवबौध्द घटकाच्या दारिद्रय रेषेखालील भूमीहीन कुटुंबाला जमीन उपलब्ध करून देण्यात येते. 4 एकर कोरडवाहू (जिरायती) जमीन किंमत कमाल रु. 5 लाख प्रती एकर किंवा 2 एकर ओलीताखालील (बागायती) जमीन किंमत कमाल रु.8 लाख प्रती एकर.

लाभार्थी निवडीचे निकष :- लाभार्थी अनु.जाती व नवबौध्द घटकातील असावा. लाभार्थी दारिद्रय रेषेखालील भूमीहीन असावा. लाभार्थीचे किमान वय १८ ते ६० वर्षे असावे.निवडीचे प्राधान्यक्रम :- दारिद्रय रेषेखालील भूमीहीन परित्यक्त्या स्त्रिया. दारिद्रय रेषेखालील भूमीहीन विधवा स्त्रिया. अनु.जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत अनु.जातीचे अत्याचारग्रस्त.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button