
भास्कर जाधवांची सही नाही, 5-3-2 चा खेळ अन् 24 चुका; फडणवीसांनी अधिवेशनाआधीच केली विरोधकांंच्या पत्राची चिरफाड
राज्यातील महायुती सरकरचे हे चौथे अधिवेशन आहे. राज्यात सध्या समाधानाकरक पाऊस झाला आहे. पेरण्यादेखील होत आहेत. खत व बियाणे पुरेसे आहे, असे सांगत सीएम देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेत असलेल्या पत्रकार परिषदेची संयमी सुरुवात केली.त्यानंतर अधिवेशनाच्या चहापानाला बहिष्कार घातलेल्या विरोधी पक्षांचे पत्र प्राप्त झाले असून त्यामध्ये विरोधकांनी केलेल्या चुकांची चिरफाडच त्यांनी सर्वांसमोर केली.विरोधकानी पाठवलेल्या पत्रात 22 मुद्दे आहेत. या पैकी बरेच मुद्दे हे जुनेच आहेत. केवळ मोठे पत्र दिसण्यासाठी फॉन्टची साईज वाढवण्यात आली आहे. या पत्रात मराठी व्याकरणाच्या एकूण 24 चुका असल्याचे स्पष्ट केले. तर दुसरीकडे भास्कर जाधव सध्या गायब असून त्यांची या पत्रावर सहीच दिसत नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला टोला लगावला.त्यानंतर या पत्रावर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाच आमदारांची तर काँग्रेसच्या तीन तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन आमदारांची स्वाक्षरी असल्याचे सांगत माविआच्या 5-3-2 वर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) खोचक शब्दांत टोला लगावला.त्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काही कामाला स्थगिती दिली असल्याची तक्रार पत्रकार परिषदेत केली. मात्र, हे स्थगिती देण्यात आलेली कामे महायुती सरकारच्या काळातील नसल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ही कामे असल्याचे स्पष्ट करीत त्यांचा आरोप त्यांच्यावरच उलटवला.