
कोकणात गणपती सणासाठी जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येण्याची शक्यता
कोविड-१९ संकटामुळे रेल्वेची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गणपती उत्सवासाठी जाण्यासाठी रस्ता वाहतुकीचा पर्याय आणि त्यात मुसळधार पाऊस यामुळे कोकणात पोहोचायचे कसे, असा प्रश्न मुंबईकर चाकरमान्यांना पडला होता. त्यात ई-पासचे बंधन. त्यामुळे कात्रित सापडलेल्या गणेशभक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. कोकणात गणपती सणासाठी जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य सरकारकडून रेल्वे प्रशासनाला पत्र पाठविण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून सज्जता ठेवण्यात येत आहे. रेल्वेकडून अद्याप अधिकृत काहीही सांगण्यात आले नसले तरी लवकरच माहिती मिळेल, असे संकेत देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com