भरतीबाबत काढलेले परिपत्रक रद्द करण्यासाठी रत्नागिरीत जिल्हा शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे धरणे.

शिक्षण संचालक पुणे यांनी २८ मे २०२५ हौजी शिक्षकेतर पद भरतीबाबत काढलेले पत्रक रद्द व्हावे, यासाठी जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. त्या ठिकाणी धरणे आंदोलन करून त्या पत्रकाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. शासनाने काढलेले पद भरतीचे पत्रक रद्द करून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाने घेतला.या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी जिल्हा प्रशासनाकडे अप्पर जिल्हाधिकारी गलांडे यांच्याकडे निवेदन दिले. राज्यातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र चिंतामणी केळकर, कार्याध्यक्ष मंगेश सावंत, सचिव अमोल लिंगायत, खजिनदार संतोष शिंदे व जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी, नऊ तालुक्याचे अध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी तसेच बहुसंख्येने शिक्षक उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button