रत्नागिरीतील तरुण होतकरू उद्योजक मंगेश भस्मे यांचे अपघातात दुर्दैवी निधन


मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीचे काम सुरू झाल्यानंतर अर्धवट कामामुळे अनेक अपघात होऊन त्यात अनेक जणांचे बळी गेले आहेत आज अशाच अपघातात एका तरुण उद्योजकाचा नाहक बळी गेला रत्नागिरी शहरात मोठ्या कष्टाने व मेहनतीने आपला व्यवसाय उभा करणारे तरुण होतकरु उद्योजक मंगेश भस्मे यांचा मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा नजीक डंपर व दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे
हा अपघात आज सकाळी दहा वाजता घडला मंगेश भस्मे हे पाली येथे राहतात
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश भस्मे हे पाली येथून आपल्या दुकानात येण्यासाठी रत्नागिरीकडे येत होते हातखंबा शाळेजवळ त्यांच्या दुचाकीला एका डंपरने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात मंगेश भस्मे गंभीर जखमी झाले त्यांच्या दुचाकीचा ही चक्काचूर झाला

रत्नागिरी शहरातील जुना माळ नाका येथील मंगेश भस्मे हे ‘बायनरी वर्ल्ड’ या नावाने प्रिंटर सर्व्हिस स्टेशन व नवीन प्रिंटर्स पुरवण्याचे काम करीत होते अनेक नामांकित कंपन्यांची अधिकृत सर्व्हिस सेंटर ही त्यांच्याकडे होतीे मेहनत व आपल्या शांत स्वभावामुळे त्यानी रत्नागिरी शहरासह ग्रामीण व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपले ग्राहक निर्माण केले होते यामुळे त्यांनी या क्षेत्रात हळूहळू आपले बस्थान निर्माण केले होते आज हातखंबा नजीक भरधाव डंपरने धडक दिल्याने त्यांचे दुर्दैवी निधन झाले त्यांना ॲम्बुलन्स मधून रत्नागिरी शासकीय रुग्णालयात आणण्यात आले परंतु त्यांना तेथे मृत घोषित करण्यात आले
त्यांच्या या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button