
चिपळुणातील प्रसिद्ध वीरेश्वर तलाव झाडा-झुडपांनी वेढला.
चिपळूण शहरातील वैभवात भर घालणार्या वीरेश्वर तलावाचे सौंदर्य सध्या कुरूप दिसू लागले आहे. नगर पालिकेकडून या ठिकाणी नियमित साफसफाई होत नसल्याने या तलावाला झाडी-झुडपांनी वेढा घातला आहे. फूटपाथवर शेवाळ पकडल्याने पावसाळ्यात पाय घसरून पडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे या तलाव परिसराची तातडीने साफसफाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी केली आहे. वीरेश्वर तलावाच्या या समस्यांकडे नित्यानंद भागवत यांनी नगर पालिकेचे लक्ष वेधले आहे. शहरात सध्या मोजकेच तलाव आपले अस्तित्व टिकवून आहेत.www.konkantoday.com