शहर विकासाबाबतीत सूचना आणी सध्या भेडसावत असलेल्या समस्या नागरिकांनी लेखी स्वरूपात द्याव्या. मनसेचे आवाहन.

मोर्चा नंतर मनसे रत्नागिरी शहरात ऍक्शन मोड वर.अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपालिकेच्या दारात यां मोर्चा नंतर मनसे पालिकेच्या कराभरा विरोधात कमालीची कार्यरत झाली आहे. आधी मोर्चा मग मुख्याधिकारीकडे तक्रारीचां पाढा मग राजीवडा मध्ये फिल्ड वर. आणी आता त्याही पुढे जाऊन रत्नागिरी मधील तमाम करदात्या नागरिकांना आवाहन केले आहे की आपण शहरात वावरत असताना अनेक गैरसोईचा अनुभव येतो.

बहुतेक वेळेस त्यावर रोज मरे त्याला कोण रडे या उक्ती प्रमाणे नागरिक दुर्लक्ष करतात पण त्यावर मनसेच्या महेंद्र गुळेकर सचिन शिंदे यांनी तमाम जनतेला आवाहन केले आहे की सदर अडचणी किंवा गैरसोई आम्हाला लेखी स्वरूपात मनसे जिल्हा कार्यालय नाकोडा कॉम्पलेक्स गाळा नंबर 15 आठवडा बाजार रत्नागिरी यां पत्त्यावर कळवावे. त्यावर मनसे मार्फत आवाज उठवला जाईल.सोबतच शहर विकासाबाबतीत नागरिकांच्या ज्या काही सूचना असतील किंवा संकल्पना असतील त्याही लेखी स्वरूपात द्यावे मनसेच्या शहर विकास आराखड्यामध्ये त्याचा नक्कीच समावेश करू असे देखील आवाहन करण्यात आले आहे. यावरून एक गोष्ट नक्की होतेय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतल्या आहेत आणी संपूर्ण ताकतीने उतरण्याची तयारी करत आहेत. या निमित्ताने शहरवासियांना नगरपालिकेत अजून एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button