रत्नागिरी शहरातील थिबाकालीन बुद्धविहाराच्या जागेतील कम्युनिटी सेंटर विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.

रत्नागिरी शहरातील थिबाकालीन बुद्धविहाराच्या जागेत उभारण्यात येत असलेल्या कम्युनिटी सेंटरविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. प्रशासनाकडून सध्या अस्तित्वात असलेल्या थिबाकालीन बुद्धविहाराचे कोणतेही नुकसान न करताना कम्युनिटी सेंटर उभारले जात आहे. अशी माहिती उच्च न्यायालयापुढे ठेवण्यात आली होती. प्रशासनाकडून आलेल्या उत्तराने यासंदर्भात रिट दाखल करण्यास नकार दर्शवत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.थिबाकालीन बुद्धविहाराच्या जागेत होणार्‍या कम्युनिटी सेंटरविरोधात रत्नागिरीतील रत्नदीप कांबळे यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यानुसार थिबाकालीन बुद्धविहाराच्या जागेत कम्युनिटी सेंटर बांधण्यास मिळालेली मंजुरी तसेच नगर परिषदेकडून मिळालेली बांधकाम परवानगीही रद्द करण्यात यावी, असे याचिकेत म्हटले होते. उच्च न्यायालयाकडून या सर्व प्रकरणाची दखल घेत उभारण्यात येणारे बांधकाम जैसे थे ठेवण्यास सांगितले होते. यानंतर नगर परिषद व प्रशासनाकडून न्यायालयापुढे आपली बाजू मांडण्यात आली. यामध्ये सध्या अस्तित्वात असलेले थिबाकालीन बुद्धविहाराचे कोणतेही नुकसान करण्यात येत नाही तसेच त्याला धक्का न लावता कम्युनिटी सेंटर उभारले जात असल्याचे न्यायालयापुढे मांडण्यात आले. मागील १ वर्षापासून थिबाकालीन बुद्धविहाराच्या जागेत उभारण्यात येणार्‍या कम्युनिटी सेंटरवरुन वाद उभा राहिला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button