
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुरू केलेली सिंधुरत्न समृद्ध योजनाही झाली बंद, मुदतवाढीसाठी मागणी.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यासाठी तीन वर्षांकरीता राबविण्यात येणारी ’सिंधुरत्न समृद्ध योजना’ बंद झाली आहे. मात्र या योजनेसाठी परिपूर्ण निधी मिळाला नसल्याने या योजनेला मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांनी शासनाला पाठविला आहे. तर या योजनेचा फलनिष्पत्ती अहवाल शासनाने जिल्हाधिकार्यांकडून मागविला आहे. त्यामुळे आता सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या योजनेचे कार्यकारी अध्यक्ष आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री नीतेश राणे या योजनेला मुदतवाढ मिळण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यास सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ मिळू शकते. अन्यथा ही योजना गुंडाळली जाणार आहे. राज्यात २०१४ मध्ये भाजप व शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर चांदा ते बांदा ही योजना सुरू केली होती..सिंधुरत्न समृद्ध योजनेची मुदत संपुष्टात आल्याने या योजनेला मुदतवाढ मिळण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी शासनाला प्रस्ताव सादर केल्यानंतर शासनाच्या नियोजन विभागाचे उपसचिव एन. बी. खेडकर यांनी जिल्हाधिकार्यांना पत्र काढत सिंधुरत्न समृद्ध योजनेचा फलनिष्पत्ती अहवाल मागविला आहे. योजनेच्या फलनिष्पत्तीसाठी अध्ययन व मूल्यमापन करून योजनेच्या प्रभावाचे व फलनिष्पत्तीचे मूल्यांकन करण्यासाठी यशदा पुणे अथवा नामवंत बाह्यसंस्थांना करारबद्ध करून त्यांच्याकडून तात्काळ शासनास अहवाल सादर करावा, असे आदेश काढले आहेत.www.konkantoday.com