हवामान कार्यालय फक्त अर्धा तास बंद होते ; माध्यमांनी वस्तूस्थितीची शहानिशा करणे आवश्यकप्रभारी अधिकारी आर.बी. सोनार यांचा खुलासा


*रत्नागिरी, दि. 25 : हवामान कार्यालय 1 ते 1.30 बंद होते, ही गोष्ट आम्हास मान्य आहे. आम्ही त्यात सुधारणा करु. माध्यमांनी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन, वस्तुस्थितीची शहानिशा करणे आवश्यक होते, असा खुलासा हवामान कार्यालयाचे प्रभारी अधिकारी आर.बी. सोनार यांनी दिला आहे.
श्री. सोनार यांनी पाठविलेल्या खुलास्यात म्हटले आहे, रत्नागिरीतील हवामान केंद्र हे 24 तास कार्यरत असून तेथे चार शिफ्ट मध्ये हवामान डेटा कलेक्ट करून तो कुलाबा वेधशाळा येते पाठवण्याचे काम चालते. एका शिफ्ट मध्ये फक्त 2 कर्मचारी काम करत असतात. अलीकडेच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा 20 जून रोजी मृत्यू झाल्याने एका स्टाफला डबल ड्यूटी करावी लागत आहे.
23 जून रोजी मी स्वतः व माझ्या सोबत चे एक कर्मचारी दुपारी 1:00 वाजे पर्यंत ऑफिस मध्ये व्यक्तिशः हजर होतो. पाणी बिल भरणा तसेच पोस्ट ऑफिस कामासाठी मी 1:00 वाजता निघुन गेलो तसेच दुसरे कर्मचारी यांना डबल ड्यूटी असल्या कारणाने जेवून येतो सांगून ऑफिसच्या मागेच असणाऱ्या निवासस्थानी जेवण करण्यासाठी निघून गेले. दुपारी 1.10 वाजता पत्रकार आले असता, ऑफिसमध्ये कोणीतरी आले आहेत हे पाहून ते जेवण अर्धवट सोडून तो कर्मचारी ऑफिसमध्ये आला व त्यांनी पत्रकारांना काय काम आहे व तुम्हाला साहेबांशी बोलायचे आहे का, फोन लावून देवू का हे देखील विचारले, पण त्यांनी तुमचं ऑफिस बंद आहे, आम्ही तक्रार करणार असे सांगितले व निघून गेले. 1:30 वाजता मी स्वतः ऑफिसमध्ये आलो
दुपारी 1:00 ते 1:30 ऑफिस बंद होते ही गोष्ट आम्हास मान्य आहे, व ती आमची चूक आम्ही मान्य करतो. स्टाफ कमी असल्यामुळे असे घडले. त्या दिवशी एक कर्मचारी सकाळी 7 वाजल्या पासून सेवेवर आहे व परत त्याला 1 ते संध्याकाळी 7 अशी 12 तास सेवा करायची होती. तो ऑफिसच्या मागे क्वार्टर्स मध्ये राहत असल्याने जेवणासाठी गेला होता. पत्रकार येताच तो कर्मचारी जेवण अर्धवट सोडून त्यांना माहिती देण्यासाठी आला व काही माहिती हवी असल्यास साहेबांशी बोला असे ही सांगितले. पण ते थांबले नाहीत किंवा फोन ही केला नाही. आपण जेव्हा एखा‌द्या कार्यालयात काही कामा करिता जातो तेव्हा ते काम पूर्ण करण्याकरिता तिथे थांबतो किंवा तो अधिकारी किंवा कर्मचारी जर त्या वेळी उपस्थित नसेल तर फोन वर बोलतो व माहिती घेतो. पण, तसे काहीही न करिता ही पत्रकार मंडळी निघून गेली.
हवामान कार्यालय फक्त अर्धा तास 1:00 ते 1: 30 बंद होते व बाकी दिवस भर चालू होते. पण पूर्ण दिवस बंद असल्या सारखे बातम्यांमध्ये लिहिण्यात आले आहे, जे पूर्ण चुकीचे आहे. हवामान ऑफिस बंद किवा ऑफिस ला कुलूप ही बातमी एक किंवा दुसऱ्या वर्तमान पत्रात आली तर समजू शकतो पण जवळपास सर्वच वर्तमान पत्रात एकाच दिवशी येते, हे आमच्या समजण्या पलीकडे आहे. रत्नागिरीतील सर्वच वर्तमान पत्रातील पत्रकारांनी त्यावेळी कार्यालयाला भेट दिली नव्हती. यातून हवामान खात्याला कारण नसताना बदनाम व लक्ष्य केले जात आहे असे वाटते.
दुपारी 1:00 ते 1:30 ऑफिस बंद होते ही गोष्ट आम्हास मान्य आहे, व आम्ही त्यात सुधारणा करू. पण त्यासाठी एकाच दिवशी रत्नागिरीतील जवळपास सर्व वर्तमान पत्रांनी तसेच सोशल मिडीयावर संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क न करता व वस्तूस्थितीची शहानिशा न करता बातमी देणे कितपत योग्य आहे, असे वाटते . आमच्या कामात काही त्रुटी असल्यास त्यात आम्ही नक्की त्यात सुधारणा करू. पण, वस्तूस्थिती जाणून न घेता कार्यालयाची बदनामी करणे योग्य नाही. सर्व सरकारी कार्यालय ही जनते साठीच काम करत असतात, पण एखा‌द्या गोष्टी वरून त्या कार्यालयास, संपूर्ण विभागास दोष देणे योग्य नाही. आपणास आश्वासन देतो कि आम्ही या त्रुटी बाबतीत नक्की सुधारणा करू .
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button